Posts

Showing posts from November, 2022

निस्वार्थ प्रेम करायला शिकवलंय.

  निस्वार्थ प्रेम करायला शिकवलंय. माझ्या लहानपणी मी आई बरोबर माझ्या अंगणात लावले होते एक झाड | रोज त्याला पाणी घालत होतो मी सकाळ दुपार संध्याकाळ | झाड वाढत होते हळू हळू त्याला पाने येत होती मऊ मऊ | रोज त्याला पाहात होतो, लक्ष ठेवत होतो कोणी त्याला खाऊ नये म्हणुन जपत होतो | त्याला नवीन पालवी फुटली कि मी आनंदी व्हायचो त्याच एखाद पान गळून पडलं कि मी धाय मोकलून रडायचो| माझ्या जिवा पलीकडे प्रेम होते त्यावर माझ सर्वच होत ते त्याला काही झाले कि मला अजिबात सहन नाही व्हायचे| औषध द्यायचो मी त्याला ते बरं व्हावं म्हणुन ख़त घालायचो मी त्याला ते भर भर वाढाव म्हणुन | कधी कधी मी त्याला कुशीत घेऊन झोपायचो आईला हट्ट करून त्याच्यासाठी अंगाई गीत म्हणायचो | अंगाई गीत ऐकून चक्क माझ्या डोळ्या सारखं ते पण आपली पाने मिटून माझ्या मांडीवर झोपायचे | खरं सांगू तुम्हाला त्यानेच शिकवले मला निःस्वार्थ प्रेम करायला त्यानेच शिकवले मला दुसऱ्यासाठी आपले आयुष्य वाहुन द्यायला| खूप मोठं झाले आहे ते आज माझ कौतुक करतय माझी प्रगती पाहून आज मनापासून रडतय| माझ्या आईनी जन्म एका मुलाला दिला पण दोन मुलांना वाढवलं या जगानी सर्व...

!! असीम शांतता आणि अवर्णनीय अनुभव !!

                                          !! असीम शांतता आणि अवर्णनीय अनुभव !! पुढच्या महिन्यात मला गजाजन महाराजांची पोथी वाचायला सुरवात करून १ वर्ष होईल. पण गेल्या वर्षात माझ्या मनात,विचारात, वागण्यात खूप बदल झाले.जसे मी पहिल्यांदा पोथीचे पारायण केले तेव्हा पासून मला शेगावला जायची आस लागली होती... गेल्या महिन्यात तो योग्य जुळून आला. मी स्वतःची गाडी घेऊन माझ्या बायकोला आणि मुलीला घेऊन तिथे दर्शनाला गेलो.पुण्याहून टप्याटप्याने प्रवास करत आम्ही शेगावला ४ वाजता पोहोचलो. वेळेवर पोहोचल्यामुळे आनंद झाला. नवीन ठिकाण , म्हणून आम्ही विसावा भक्त निवास मध्ये चॊकशी करायला गेलो. पण तिथे राहायला खोली शिल्लक नव्हती. म्हणून आम्ही आनंद सागरच्या रस्त्यानी निघालो, रस्त्यात उजव्या बाजूला आनंद विहार दिसले, तसे आपोआप गाडीची चाके तिकडे वळली आणि आत शिरल्यावर तिथली स्वच्छता राखणारे सेवेकरी. तिथली सुरक्षा बघणारे सेवेकरी, आमची नोंदणी घेणारे सेवेकरी असे सगळे पाहिल्यावर मन एकदम शांत झालं. त्य...

आपल्या मनाचा वापर कसा करायचा:

                                                              आपल्या मनाचा वापर कसा करायचा: प्रत्येक मन म्हणजे एका गुलाबाच्या फुलासारखं आहे, प्रत्येक फुलात जसा वेगळेपणा असतो तसच माणसाचं पण असतं. मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान बाळ, प्रत्येकाचं वेगळेपण हे त्याच्या वागण्यात, कृतीत,विचार करण्यात,वृत्तीत दिसून येतं. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत त्याचे संस्कार चांगले आहे किंवा वाईट आहेत असं म्हणतो. आपण असं पण म्हणू शकतो कि जशी मुला मुलीची जडण घडण तसे त्याच्यावर होणारे संस्कार. आता हे संस्कार येतात कुठून ? सुरवात होते ते आई आणि वडीलांपासून, नंतर शाळेतून, नंतर शेजारचे आणि मित्र मैत्रिणीपासून आणि शेवटी समाजाकडून. याच कारणामुले लहान मुलांना सांगितलं जात "वाईट संगत असलेल्या मुलांपासून लांब रहा किंवा त्यांच्याशी मैत्री करू नकोस, असे मित्र नसलेलं बरे किंवा मैत्रीण नसलेली बरी असंही आई किंवा वडील सांगतात. आता आपण माण...

!!!सेवा भाव आणि निःस्वार्थ मन!!!

Image
                                                         !!!सेवा भाव आणि निःस्वार्थ मन!!! गजानन महाराजांची पोथी वाचायला सुरुवात करून ३ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. या गेल्या वर्षात खूप चांगली गोष्टी घडल्या!! त्यातली एक शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन आणि तिथल्या सेवेकर्यांनी दिलेला अवर्णनीय अनुभव. तिथल्या स्वच्छतेबद्दल मी खूप ऐकले होते. जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहीले तेव्हा मनात खूप विचार आले. तेच मी इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे सेवेकरी अखंड काम करत असतात. सुरक्षेपासून ते प्रसादाच्या सोयीपर्यंत हे सेवेकरी कुठलीही अपेक्षा न बाळगता आणि निःस्वार्थ मनाने करत असतात.ते सर्व काही गजानन महाराजांच्या भक्तांसाठीच करत असतात. तिथे गेल्यावर एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखे वाटते. जिथे तिथे फक्त आणि फक्त निरागस , निर्मळ आनंदाने ओसंडून वाहणार मन. मला वाटते त्यामुळेच तिथे येणारा प्रत्येक भक्त स्वतःतले षड्रिपू सोडूनच ...

!! मला जागा द्या !!

                                                                             !! मला जागा द्या !! खूप दिवसांपासून या विषयावर लिहायची इच्छा होती, शेवटी आज हा विषय मांडावा असं वाटलं . आपण खूप घाईत, सकाळी स्वतःचे प्रातः विधी करून, तयार होऊन ऑफिसला जायला निघतो. आता कोण २ व्हिलर,कोण ४ व्हिलर काढतो (स्त्री पुरुष सगळे). रस्त्यानी निघाला कि हातात गाडी आणि डोक्यात विचार असे आपण प्रवासाला निघतो. कोणाचा १ किलोमीटरचा प्रवास तर कोणाचा ५० किलोमीटरचा. आता या पूर्ण प्रवासात निघाल्या पासून ते इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत तुम्हाला हजारो गाड्या दिसतात किंवा लागतात (सायकली,बसेस,दुसर्यांचा ४ व्हिलर,२ व्हेलीर आणि रिक्षा इत्यादी ).दुसऱ्या भाषेत म्हणाल तर त्या तुमच्या मध्ये येतात. आता आपण मूळ मुद्याकडे वळूया, ती म्हणजे गाडी चालवता पुढे जाण्याची घाई. आता जायचा तर सगळ्यांनाच असतं. पण मी पुढ...

""मला हवी आहेस""

                                                                                  ""मला हवी आहेस"" प्रिय आईस, सर्वकाही सांगावं, खूप काही विचारावं असं लहान असल्या पासून वागणारा मी आज स्वतःच्या संसारात किंवा स्वतःच्या कामात इतका अडकलो आहे कि तुझ्याशी बोलायची इच्छा असून सुद्धा ते प्रत्यक्षात घडत नाही. मनात आलं म्हणून लिहितो आहे मनातले सांगतो आहे तुला. मी दूर गेलो आहे समजू नकोस. तुला रोज फोन करत नाही म्हणून तुझा विचार करत नाही असे पण समजू नकोस.तुझी आठवण मला माझ्या बऱ्याच सवयीनं मधून दिसते आणि जाणवते. माझ्या लहानपणी मला ताप आला किंवा माझ्या पोटात दुखायला लागले किंवा आता जरी मला काही व्हायला लागलं कि तुझ्या मनाची होणारी घालमेल, माझ्या संगोपनात कुठलीही कमतरता न व्हावी म्हणून तू करणारी धडपड, दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्याचा पाठ पुरावा. अखंड...

प्रिय मित्र,

  दिवस रात्र मी माझ्या सर्व हितांमध्ये समृद्ध होत आहे. दिवस रात्र मी माझ्या सर्व हितांमध्ये समृद्ध होत आहे. प्रिय मित्र, विषय : काळजी वाटते , काळजी घे, उपाय कर पत्र लिहिण्यास कारण कि कालच तुझा बद्दल विषय निघाला तेव्हा समजले कि तुला कंबरेचा खूप त्रास होतो आहे. हा प्रश्न आता काही जुना नाही, आपले राहणी मान , रस्त्यावरचे खड्डे, काही प्रमाणात भेसळ युक्त अन्न आणि सततच्या विचारांचा ताण, बाकीचांच्या मनातले राग, लोभ, मत्सर आणि बरेच काही या परिस्थितीला कारणीभूत आहेत. या वर काही चांगला उपाय करता येतील या साठी माझा मनात विचार आला कि तो तुला पत्रानेच कळवावा म्हणजे सविस्तर सांगता येईल शिवाय तुझ्याकडे याची प्रत राहील जी तू पुन्हा पुन्हा वाचू शकशील. आता मूळ प्रश्नाकडे पाहूया , सतत चुकीचे बसणें, तासनतास एका ठिकाणी बसणें ,२ चाकी वरून सतत प्रवास, त्यात रस्त्यातील खाड्यांमुळे हाडांना लागणारे झटके, कमी झोप,नियमित व्यायाम, हाडांना मजबुती देणाऱ्या अन्नाचा अभाव या सगळ्या गोष्टींचा शरीवर आणि मनावर खोलवर परिणाम होतो आणि मग ते कुठल्या तरी दुखण्यातून ते आपले तोंड वर काढते. आपले शरीर काही प्रमाणात झीज सहन करते...

अभिमन्यू चक्रव्यूह :

  मला कोणाच्याही मनाला दुखावण्याचा प्रयत्न इथे केलेला नाही, जे प्रत्यक्षात दिसते आहे , तेच सांगतो आहे. कदाचित ते चुकीचे पण असेल. त्यासाठी क्षमस्व अभिमन्यू चक्रव्यूह : कितीही प्रयत्न केलेस तरी पुन्हा तू अडकणार लाख वेगळे विचार केलेस तरी पुन्हा तू या डबक्यात येऊन पडणार नवीन दिवस नवीन विचार नवीन इच्छा आणि मार्ग घेऊन येणार खूप चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्टा, धर्य धावून सुद्दा तू परत त्या डबक्यातच राहणार व्यर्थ जातात तुझे प्रयत्न, नाही किंमत तुझा इच्छांना धुळी सारख्या हवेत उडून नाहीशा होतात तुझा कल्पना या ब्रह्मांडा मधला एवंडुसा कण तू याच मातीतून आला तू सुद्धा एक दिवस याच मातीत मिसळून जाणार शांत कर मनाला, नको पळूस त्याच्या मागे घे लगाम त्याची हातात तुझ्या सोडून दे हा लपाछपीचा खेळ जग जीवन सामान्य दुसऱ्याला पण ते जगण्यात मदत कर सोडून दे alexander सारखे "concurring the world " चे स्वप्न एक सामान्य माणूस बनायचा प्रयत्न कर सोडून दे राग,लोभ,द्वेष,मद आणि मत्सर स्वतःमधल्या माणसाला जागवण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न कर

इच्छा, चिकाटी, शिस्त, इच्छाशक्ती, विश्वास, जिद्दी, दृढनिश्चय?

आजचा विषय सगळ्यांचा मनातला आहे. तो म्हणजे यश. आज इकडे तिकडे बघा, सगळे यशाचा मागे पळताना दिसतात. यावर तुम्ही म्हणाल यात काय गौण आहे. गौण काहीच नाही. उलट मी म्हणेन कि हा २ अक्षांरांचा खेळ जिंकायला भरपूर काही लागतं. ते कोणाच्या वाट्याला येत किंवा कोणाचा वाट्याला येतच नाही, कितीही प्रयत्न केले तरी, मग तो किंवा ती किंवा त्याचा जवळचे शेवटी ते नशिबावर किंवा कर्मावर सोडून देतात. पण याचा विरुद्ध जे यश मिळेपर्यंत जे लढतात त्याला तोड नाही. हिंदी मध्ये म्हणायचं तर "उनका तो जवाब नाही,उनकेलीये ये लब्ज भी कम है!". आपण अशा बऱ्याच लोकांची उदाहरणे पाहिलीत किंवा ऐकलीत सुद्धा. त्या आधी हे का घडतं याची कारणं पाहुयात. यश मिळवण्यासाठी ज्या ११ गोष्टींची गरज लागते, त्याचं सगळ्या गोष्टी या माझा आजच्या लेखाच्या शीर्षक आहेत. कारण जीवनात याचं गोष्टींची जाणीव जो पर्यंत पूर्ण पणे होत नाही, तोपर्यंत यश तुमच्यापासून मैलावरच राहतं.यालाच मराठीत एक म्हण आहे "कळतंय पण वळत नाही" किंवा "ज्ञान आहे पण ते कसं वापरायचं तेच कळत नाही". म्हणूनच आयुष्यात एक चांगला गुरु मिळायला खूप भाग्य लागतं. असो. आता...

आत्ता

  आत्ता मला वाटलं कि मी आत्ता किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं तर now वर काहीतरी लिहावं आणि मी ते लिहायला घेतलं. आजचा विषय आहे आत्ता, हो आत्ताच. यात खूप मोठी गम्मत आहे. हा जो क्षण तुमच्याकडे आहे जो तुम्ही हा लेख वाचताना वापरता आहेत तोच जगातला सर्वात मौल्यवान क्षण आहे. कारण त्यातच बराच काही दडलेलं आहे. आता तुम्ही आनंदी आहात का दुखी आहात ते मला माहित नाही, पण हा क्षण तुमचा १००% तुमचा आहे. तो तुम्ही कसा घालवायचा ते १००% तुमच्या आणि फक्त तुमच्याच हातात आहे. कोणी तुम्हाला काही बोललं म्हणून त्यावर विचार करण्यासाठी हा क्षण द्यायचा की ते सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीत तो व्यतीत करायचा. आता तुम्ही म्हणाल कि सगळे सल्ले वाईट नसतात किंवा विचार करायला लावणारे असतात. हो नक्कीच आणि विचार केलाच पाहिजे. तुम्ही कसा विचार करतात यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.असो कुठल्या कंपनीचा मालक असो किंवा एखादा नोकर दोघांना घड्याळाचे २४ तासच मिळतात. पण मिळणार वेळ तो कसा वापरतो यामुळे फरक पडतो. म्हणजे whatsapp वर पूर्ण दिवस किंवा youtube वर विडिओ बघण्यात दिवस गेला तर फरक काहीच पडणार नाही. कारण तुम्ही तुमचा प्रगतीसा...

!!!आवड आणि जीवन!!!!

  हा विषय खूप जुना आहे.तसे यावर खूप लोकांनी लिहिले पण आहे. आज मी माझ्या अनुभवांवरून या बद्दल माझे मत मांडणार आहे. कदाचित ते तुम्हाला आवडेल. प्रत्येक माणसाची आवड वेगळी असते आणि त्यानी ती लहान असतानाच ओळखली तर खूप उत्तम, जर ती तुमची तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या माणसांची म्हणजेच आई,वडील,मित्र, मैत्रीण किंवा तुमच्या साथीदाराची मदत घेऊ शकता. याला एक कारण आहे , जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करत असता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा भाव, आनंद , तुमची एकाग्रता, आणि तुमची चिकाटी तुम्ही नाही बघू शकत , पण ते तुमच्या आसपासच्या माणसांना लगेच समजते.आणि याचा तुम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आता लोक म्हणतात कि कधी कधी जसा माणूस मोठा होतो तश्या त्याच्या आवडी निवडी बदलतात. असेलही काही टक्के ते खरे पण मूळ आवड जी तुम्ही तुमच्या जन्माबरोबर या जगात घेऊन आला आहात ती तशीच असते. त्याला जी बालपणात समजते आणि उमजते तो सर्वात भाग्यवान. बऱ्याच लोकांनबरोबर अगदी विरुद्ध घडते, परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या आवडी सोडाव्या लागतात किंवा काही लोकांना कळतंच नाही कि नक्की त्...